साहित्य
१ कप बासमती तांदूळ,
१ ते २ मध्यम कांदे,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
अर्धा टी स्पून जिरे,
१ लवंग,
१ टी स्पून आले पेस्ट,
१ टी स्पून लसून पेस्ट,
७ ते ८ सुके काजू,
१ टेबल स्पून तूप ( घी ),
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
पाणी अंदाजे,
मीठ चवीनुसार.
कृती
तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.
एका खोलगट भांड्यात तूप घेऊन त्यात जिरे, लवंग, आले-लसून पेस्ट , काजू , हिरव्या मिरच्या तुकडे करून टाका व मिश्रण हलवून घ्या. मंद आचेवर १ ते २ मिनिटे ठेवा. आता त्यात कांदे बारीक चिरून टाका व सोनेरी तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात तांदूळ घाला व मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करा. २ ते ३ मिनिटांसाठी मंद आचेवर ठेवा. चमच्याने मिश्रण सारखे हलवत राहा.
आता त्यात २ कप ( अंदाजे ) पाणी व चवीनुसार मीठ घालून भात मंद आचेवर शिजू द्या.
गरम गरम भातावर कोथिंबीर पसरून कोशिंबीरीबरोबर सर्व करा.
No comments:
Post a Comment