साहित्य
दीड वाटी बासमती तांदूळ,
अर्धी वाटी राजमा,
अर्धा टी स्पून सांबार मसाला,
१ टी स्पून लाल मिरीची पूड,
पाव टी स्पून हळद पावडर,
२ लाल मिरच्या,
३ ते ४ कडीपत्ता पाने,
१ मध्यम कांदा,
१ मध्यम टोमॅटो,
१ टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरलेली,
अर्धा टेबल स्पून जिरे,
अर्धा टेबल स्पून मोहरी,
अर्धा टेबल स्पून उडीद डाळ,
३ टेबल स्पून तेल,
१ टेबल स्पून लिंबाचा रस,
मीठ आवश्यकतेनुसार.
कृती
राजमा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवा. भिजवलेला राजमा कुकरला लावून १ ते २ शिट्या काढून घ्या.
राजमा त्यातील पाणी काढून बाजूला थंड करण्यासाठी ठेवून द्या .
बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या. हा तांदूळ पण कुकरला लावून १ ते २ शिट्या काढून घ्या.
तांदूळ बाजूला थंड होण्यासाठी ठेवून द्या.
एका खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, उडीद डाळ टाका. मोहरी तडतडल्यावर
त्यामध्ये कडीपत्ता पाने, आणि अक्ख्या लाल मिरच्या टाका. मिश्रण हलवून एकजीव करा.
आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून वरील मिश्रणात घाला व गुलाबी होईपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्या.
आता वरील मिश्रणात सांबार मसाला, हळद, मिरीची पुड, राजमा, लिंबाचा रस आणि मीठ (चवीप्रमाणे ) घालून मिश्रण एकजीव करा. आता त्यात एक टोमॅटो बारीक चिरून घाला व मिश्रण ढवळून एकजीव करा.
आता त्यात तांदूळ घालून चमच्याने हळुवार मिश्रण एकजीव करा जेणेकरून तांदळाला सर्व मिश्रण लागेल. मंद आचेवर २ ते ३ मिनिटे झाकण लावून भात शिजू द्या.
बारीक चिरलेली कोथिंबीर भातावर पसरवून गरम गरम वाढा.
No comments:
Post a Comment