साहित्य
१ कप बासमती तांदूळ,
२ ते ३ मध्यम टोमॅटो,
१ ते २ मध्यम कांदे,
२ ते ३ हिरव्या मिरच्या,
अर्धा टेबल स्पून आले पेस्ट,
अर्धा टेबल स्पून लसून पेस्ट,
१ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर,
१ ते २ लवंगा,
अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर,
१ ते २ वेलदोडे ठेचून,
१ तमाल पत्री,
तेल आवश्यकतेनुसार,
मीठ चवीनुसार.
कृती
तांदूळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून १० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
एका खोलगट पॅन मध्ये आले पेस्ट, लसून पेस्ट, लवंगा, मिरी पावडर, दालचिनी पावडर, वेलदोडे ठेचून, तमाल पत्री आणि कांदे बारीक चिरून टाका. तेल आवश्यकतेनुसार वापरा. कांदे तांबूस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. चमच्याने मिश्रण हलवत राहा. ५ ते १० मिनिटे मंद आचेवर ठेवा व चवीनुसार मीठ घाला.
आता टोमॅटो बारीक चिरून वरील मिश्रणात टाका आणि चमच्याने हलवून मिश्रण एकजीव करा. १ ते २ मिनिटे मंद आचेवर ठेवा.
आता त्यात तांदूळ घाला व पुन्हा मिश्रण एकजीव करा. ३ ते ४ मिनिटांसाठी मिश्रण मंद आचेवर ठेवा व चमच्याने हलवत राहा जेणेकरून तांदळाला सर्व मिश्रण लागेल. आता त्यात अंदाजे पाणी घालून मिश्रण एकजीव करा. भात शिजेपर्यंत घट्ट झाकण लावून मंद आचेवर ठेवा.
वाढताना कोथिंबीर बारीक चिरून भातावर पसरवा व गरम गरम सर्व करा.
No comments:
Post a Comment