साहित्य
२ कप बासमती तांदूळ,
२ कप भाज्या खालील प्रमाणे
बटाटे, कांदे, गाजर, फ्लोवर,
दोडके, फरस बी, दुधी, शिमला मिरची,
२ टेबल स्पून दही,
एक टोमॅटो, २ टेबल स्पून तूप,
अर्धा टी स्पून दालचिनी पावडर ,
अर्धा टी स्पून लवंग पावडर,
अर्धा टी स्पून हळद पावडर,
अर्धा टी स्पून धने पावडर,
अर्धा टी स्पून आले-लसूण पेस्ट
मीठ अंदाजे
लिंबाचा रस अंदाजे
प्रत्येकी अर्धा टी स्पून जिरे आणि मोहरी
कृती
तांदूळ धुवून उकडून घ्या, तांदळाचा प्रत्येक दाणा वेगळा होईल एवढा वेळच तांदूळ उकडा.
एका पसरट प्लेट मध्ये थंड करण्यास काढून ठेवा.
एका पॅन मध्ये मध्यम आचेवर तूप गरम करा. लवंग,दालचिनी, जिरे, मोहरी आणि आले-लसून पेस्ट त्यात घालून एक मिनिटभर ठेवा. चमच्याने ढवळत रहा.सर्व भाज्या बारीक निमुळते तुकडे करून त्यात मिसळा, टोमाटो बारीक तुकडे करून घाला. उरलेले मसाले व दही घाला व मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळा.
झाकण घालून भाज्या मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा.
ओवन मध्ये ठेवण्यासाठी असलेल्या भांड्यात थोड्या भाताचा हाताचा थोडा दाब देऊन एक थर तयार करा. आता तयार केलेल्या भाज्यांचा एक थर द्या ( थोड्या भाज्या राखून ठेवा ).
पुन्हा उरलेल्या भाताचा थर पहिल्या प्रमाणे त्यावर तयार करा आणि त्यावर उरलेला भाज्यांचा थर
तयार करा.
आता भांडे फॉइल ने व्यवस्थित बंद करा आणि ओवन मधे १५ मिनिटांसाठी बेक करा.
कोथिंबीरीची पाने घालून गरम गरम सर्व करा
No comments:
Post a Comment